Skip to main content

मकरसंक्रांत

काकू, तिळगुळ घ्या गोड बोला.

मला माहितीय मेल्या, भयंकरणीकडे आधी गेला असशील नंतर माझी मेलीची आठवण काढली असशील.

आज्जीच्या परवानगीशिवाय मी कधी काही करतो का काकू ?

तिळगुळ पण तिच्या सल्ल्यानेच केला असशील?

हो तर,गुळ चिरायला पण आधी तिचाच सल्ला घेतला .

तुला पाडायला म्हणायचं आहे का?.

जिवंत रहायचयं काकू मला पुढच्या संक्रांतीपर्यंत.

माझ्या मनात असलेल्या छोट्या छोट्या तिळांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी गोड शब्दांचा गुळ घालायचा प्रयत्न केलाय काकू,आपले गोड शब्दसुद्धा काहीजणांना तिरकस टोमणे वाटतात🥲.

आधी बोलत जावं ! बाबा,समोरच्याला गुड, कडू वाटेल हे त्यांच्या त्या त्या वेळच्या मनस्थितीवर अवलंबून असते आणि हो, आपण सिग्धपणे माणसं जोडत गोडवा जपायचे काम करत रहायचे, आपल्या हातात तर तेवढेच असते.

नमस्कार करतो काकू.

बरं वाटलं रे बोलून, नाहीतर "२०० मेसेज पाठवण्यापेक्षा दोन गोड शब्द बोलून बघा" हे ही मेसेजमध्येच सांगायचे दिवस आलेयत हो.

           
दोन गोड शब्द 
कानावर यावे,
दोन गोड क्षण
मनात उरावे

तोच हा दिन सुगीचा
मकर संक्रामणाचा
मनातून मनामध्ये
रुजत जावयाचा.

माझ्या कणाकणाने जोडलेल्या सर्व आप्तांना,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४