इतके सोपे असतं का कोणाला वजा करणे
इतके सोपे डोळ्यातले स्वप्न पुसून टाकणे.
माणसांकडे माणूस म्हणूनच बघितलं पाहीजे, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, ना मुलगा म्हणून,ना पालक म्हणून,ना साथिदार-जोडीदार म्हणून.
तो चुकत असतो,घडत असतो,बिघडतही असतो. त्याला समजून घेता आले पाहीजे, आधार देता आला पाहिजे.सावरता आलं पाहिजे.
त्याच्याकडून परिपूर्ण असण्याची अपेक्षा करण्याआधी आपल्या आत डोकवता आलं पाहीजे.
स्वत:च्या मनाला जपण्याआधी दुसऱ्याचे मन समजून घेता आलं पाहिजे.
अलिप्ततेचा बुरखा पांघरता पा़ंघरता आपण रुक्षतेकडे तर वाटचाल करत नाही आहोत, हे डोळसपणे बघता आले पाहिजे.
Comments
Post a Comment