मेघांच्या डोळ्यांतही झड दाटून येते
जेव्हा आठवण पाण्याची मनी दाटून येते
लवलवणारे पाते तेव्हा आतून सुकून जाते
जेव्हा धरती त्याचे अन्न आतून तोडून घेते.
फुल ही त्याचे धन वाऱ्या हाती सोपवते
जेव्हा झाड फुलाच काम संपवून टाकते.
प्रत्येक गोष्ट नाही घडत मनासारखी नेहमी
मन तेव्हा सांधा बदलून मार्ग जुळवून टाकते,
प्रत्येकाचे कार्य असते नशीबाने नेमलेले
नियती नावाचे कोडे गुंते सोडवून टाकते.
Comments
Post a Comment