Skip to main content

Posts

Showing posts from 2020

स्पर्श

न संपणारी प्रतिक्षा

काही काही रोपांचे कधीच स्वप्न नसतं की सावली देणाऱ्या वृक्षा पेक्षा खुप खुप मोठ्ठ होवून ती घनगर्द छाया दूर लोटून उंच उंच जावे. पण कधीकधी आजूबाजूचा निसर्ग कोपतो,वादळ उठते आणि तो वृक्ष आपल्या सावलीची दिशा कक्षा दुसरीकडे वळवतो. तेव्हा त्या रोपट्या हातात उरते ते फक्त त्या वृक्षाच्या पायतळ असलेल्या ओलाव्याच्या आधाराने स्वत:ला सावरत तो वृक्ष आणखीन मोठा होईल आणि पुन्हा एकदा आपल्यावर सावली धरेल याची वाट पाहणे. न संपणारी प्रतिक्षा.

उत्सव

आठवण

संस्कार

पुलंनी एका प्रस्तावनेत लिहीले आहे," पैसा येताना आपले चारित्र्य घेवून येतो".     तसेच शब्द उमटताना आपली संस्कृती घेवून येतात.     माणसं येताना संस्कार घेवून येतात,जसे दुधापासून तुप बनताना वेगवेगळे संस्कार त्याच्यावर घडतात आणि त्यावर त्याचे गुण ठरतात,त्याच प्रमाणे माणसावर जन्मापासून सतत आजूबाजूच्या लोकांकडून संस्कार घडत असतात.     माणसाला गुण-अवगुण त्यापासून प्राप्त होतात. माणूस घडतो किंवा बिघडतो ते या संस्कारांमुळेच.

आयुष्याचा अर्थ

आयुष्याचा अर्थ शोधण्याचा कधीही प्रयत्न करु नये, असंख्य निरर्थक गोष्टींचे गाठोडे म्हणजे आयुष्य. आयुष्य म्हणजे अडगळीची खोली. शेकडो शोधू तेव्हा एक अल्हाददायक निघते. 

शब्द

एकाकी

एकाकी जगणाऱ्याचे दु:ख ही  त्याचे स्वत:चे नसते, ते सुद्धा दुसऱ्याच्या सुखाची पाऊलवाट शोधत असते. इमेज आंतरजालवरुन साभार

एहसास हो तुम

तुम एक ऐहसास हो तुझे कैसें बयां करु। खुशीयों की खुशबू हो तुम तुझे कैसे जुदा करु।। तुम मेरी अपनी हो तुम्हे कैसे भुला करु। मेरी सांसें हो तुम तुम्हे कैसे जुदा करु।।

भ्रष्ट आचार-भ्रष्टाचार

भ्रष्टाचाराच्या विरोधात आपल्या मनात टोकाचा द्वेष असतो आणि आपण तो वेळोवेळी व्यक्त करतो.      भ्रष्टाचार हा फक्त पैशाचा अपहार एवढ्यापुरताच मर्यादित असतो आणि तो सुद्धा सरकारी पैशाचा अपहार अशी आपली ठाम समजून असते.       भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार, चुकीची वागणूक. आपणही कित्येकवेळा असे वागत असतो. कंपनीतली स्टेशनरी घरी नेणे, बस-रेल्वेने प्रवास करुन टॅक्सीचे बिल सादर करणे, आजारपणाचे खोटे सर्टिफिकेट सादर करणे.         खुप लांब कशाला जायचे, मराठी माणसाच्या घराघरातले म्हणून बिरुदावली मिरवणारे कालनिर्णय दोन दिवस पुर्वीपासूनच सोशल साईटवर वरुन फिरु लागलेय. जे दुर्मिळ नाही,खेडोपाडी कुठेही उपलब्ध होवू शकणारे होवू शकणारे, ३०/३५ रुपयांना सहज मिळू शकणारे हे कॅलेंडर, बेकायदेशीरपणे स्कॅन केलेले ते पण शासनाने बंदी घातलेल्या कॅमस्कॅनरच्या सहाय्याने हाही एक प्रकारचा भ्रष्टाचारच.        चला आपणतरी कालनिर्णयकर्त्यांच्या अखंड प्रयत्नांचे, सातत्याचे कौतुक करुया.      आपल्या लोकल उत्पादनाच्या वितरणातील भ्रष्टाचार निपटून काढूया. ...
या जगात चांगलं आणि मनासारखं जगणं कुणी भेट म्हणून देत नाही !  ते आपणच स्वतःला घडवत मिळवावं लागतं. अश्या प्रयत्नांची सुरुवात कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही क्षणी करता येते ! अगदी या क्षणापासून !!! (लोकसत्ता)

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

शेर

माझा जीव अंतरी का रडत आहे आरसा का अजून हे लपवत आहे मी किती केले प्रयत्न करण्या सिद्ध अजूनही स्वत:शीच झगडत आहे.
॥ स्वामी ॥ आपल्या बुद्धी पेक्षा जास्त  हुशार आहोत असे भासवण्याचा  प्रयत्न कधीही करू नये.  कारण जेव्हा सत्य  उघड होते तेव्हा फक्त  तुमच्या बुद्धीवर नाही तर  तुमच्या खरेपणावर,  तुमच्या खऱ्या भावनांवरही  भलेमोठे प्रश्नचिन्ह  कायमस्वरूपी चिकटते.

पसारा.....

      पसारा शब्द सर्च केल्यावर गुगल आज अप्सरा संबंधी रिझल्ट का दाखवत असेल. गुगलपण सोशल साईट्सच्या आहारी गेलं असावं कदाचित.        व्हॉट्सअप-फेसबुककरांना अशीच सवय असते. तुलना आणि उपमा याशिवाय त्यांची एकही पोस्ट लिहून होत नाही. नात्याला झाडाची उपमा देतील, प्रेमाला पावसाची, चेहऱ्याला चंद्राची    गुगलही त्यांच्याच रंगात रंगले असावे.    अप्सरा आणि पसारा यात एक साम्य आहेच. अप्सराही हवीहवीशी वाटते पसाऱ्यासारखी आणि तरीही सर्वसामान्य माणसाला तीला आयुष्यभर सांभाळत बसणे अशक्यच, पसाऱ्यासारखेच.    हव्याहव्याशा वाटणाऱ्या पसाऱ्याला कधीतरी स्वत:पासून दूर लोटावेच लागते, मग तो पसारा जमवलेल्या वस्तूंचा असो वा जपलेल्या दु:खद आठवणींचा.    अगदी तसंच आपल्या स्वप्नातल्या अप्सरेला दुर सारुन आपल्या आयुष्यातील नवदुर्गांच्या सहवासात रममाण व्हावेच लागते.    हेच तर आयुष्य आहे.

आठवण

आठवणींचा चातक पक्षी तिच्या नावा भोवतीच घुटमळतो, रित्या झालेल्या डोळ्यांनी तिच्या पाऊलखुणांची चाहूल घेतो.

मेसेज आणि नात्यांचा उत्सव

सर्वात जास्त लिहीला,वाचला आणि फॉरवर्ड केला जाणारा मेसेज विषय म्हणजे नाती, मैत्री आणि विश्वास.          तरीही सर्वात जास्त तुटणाऱ्या गोष्टी म्हणजे नाती,मैत्री आणि विश्वासच.          म्हणजे आपण जे लिहीतो,बोलतो,फॉरवर्ड करतो त्या गोष्टी आपण कधीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करत नाही,आपला ठाम अंधविश्वास असतो एक मेसेज पाठवला की सर्वकाही ठिक होवून जाईल.          पण जग एवढे साधे,सोपे कधीच नसते. जो वेळ हे मेसेज पाठवण्यात आपण खर्ची घालतो तोच वेळ ही नाती,मैत्री,विश्वास जपण्यासाठी वापरला तर हे मेसेज वाचण्यासाठी,लिहिण्यासाठी मोकळा वेळ आपल्याकडे शिल्लकच राहणार नाही.          वपु. उत्सव नात्यांचा असा ज्याचा उल्लेख करतात तो उत्सव आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनून जाईल.
गेल्या काही दिवसांत प्राप्त झालेले अमूल्य ज्ञान..... डबल स्टँडर्ड अर्थात विश्वातील सर्वात हरामखोर प्राणी. परवाच मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल देताना म्हटले, "वेश्याव्यवसाय हा गुन्हा नाही". आता गंमत अशी आहे, मुलींना/स्त्रीला वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ढकलणारा पुरुषच. त्यांच्याकडे क्षणिक समाधानासाठी जाणारा पुरुषच आणि त्यांना गुन्हेगार ठरवणारे पुरुषच. स्वत:च्या पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना अटक केले जाते. पण ग्लॅमरसाठी, वैभव मिळवण्यासाठी,प्रसिद्धीसाठी तेच सर्व काही करणाऱ्या स्त्रीला मात्र, मान,सन्मान,चॅनलचे दरवाजे खुले होतात. दोन्हींच्या पाठी असतो स्वत:चा स्वार्थ साधू पहाणारा पुरुषच.देहाची विक्री करणाऱ्यांचा वापर बुद्धीची/आत्म्याची विक्री करणारा करतो तो पण पुरुष एका अर्थाने वेश्याच असतो. बाईच्या पोटातून जन्म घेणारा. स्वत:च्या स्वार्थासाठी जमेल तसा बाईचा वापर करणारा आणि स्वत:चा वंशाचे बीज ओटीत रुजत घालण्यासाठी बाईच्या कुशीत शिरणारा सुद्धा पुरुषच.  डबल स्टँडर्ड विषारी प्राणी.
म्हाताऱ्यांचे प्रेम आणि अळवावरचे पाणी फक्त दिसते चमकदार पण असते निर्जिव.

मराठी मनाचा राजा

मराठी माणसाच्या मनामनावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.       मराठी मुलुखाच्या समृद्धीसाठी,सन्मानासाठी महाराजांना आयुष्यभर लढा द्यावा लागला. परकीयांशी आणि स्वकीयांशीसुद्धा.       हा लढा स्वराज्य स्थापने नंतर तरी थांबेल असे वाटले होते पण तो अविरत चालू आहे.       व्हिक्टोरीया टर्मिनसच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नामकरणासाठी  सुद्धा १९९६ पर्यंत वाट बघावी लागली. नशीबाने तेव्हा मराठी लोकांच्या मागणीचा न्याय देणारे समंजस, सद्हृदयी अटलबिहारी वाजपेयी देशाच्या पंतप्रधानपदी होते.       सहार विमानतळाचे नामकरण असो किंवा सहार विमानतळावर पुतळ्यासाठी लोकांना आंदोलन करावे लागले. विमानतळ विस्तारीकरणाच्या वेळी महाराज्यांचा पुतळा गोडावून शेजारी उन्हातान्हात उभा केला गेला. त्यावर सावलीसाठी सुद्धा आंदोलन करण्याची वेळ आली.       छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतळ्याची पुनर्स्थापना करण्यासाठी पुन्हा आंदोलन. नावात महाराज शब्द वापरण्यासाठी आंदोलन.       महाराजांनी ज्याच्या वि...

अटळ प्रवास

आपले वय म्हातारपणाकडे झुकू लागलेय, हे समजून का घेत नसतील लोक की, सगळं कळत असत माणसांना पण हव्यास सुटत नसतो.    काही गोष्टी वयानुसार दुर्मिळ होत जातात आणि ओढ वाढतच जाते. अंतिम सत्याकडे जाताना अडखळायची ही स्टेशन्स आहे.    काही गाडीत बसून राहतात, खिडकीतून बाहेरचे निरिक्षण करत. तर काही पाय मोकळे करायला प्रत्येक स्टेशनवर उतरतात.    काहींना भुक भागवायची असते,काहींना तहान तर काहींना मोकळे व्हायचे असते.    प्रवास करावाच लागतो किती ही नाकारले तरी.    अगदी आपल्या रेल्वे सारखाच, स्टेशन घेत घेत, साइडिंगला वाट बघत वाट बघत एकाकी पणे पुढे जाण्याचा,  सिग्नल मिळण्याची वाट बघत.

श्रीकृष्ण- आपल्या आतमधलि

महाभारतीय युद्ध संपल्यावर, श्रीकृष्णाने अर्जुनाला रथातून पायउतार होण्यास सांगितले,अर्जून रथातून खाली उतरुन दूर गेल्यावर खाली उतरल्यावर श्रीकृष्ण रथातून खाली उतरले,त्याक्षणी अग्नीने रथाला आपल्या कवेत घेतले.रथ क्षणभरात जळून भस्मसात झाला.      अर्जूनाने श्रीकृष्णाला यामागचे रहस्य विचारले,श्रीकृष्णांने सांगितले, शत्रुपक्षातील अथिरथी,महारथींनी तुझा वध करण्यासाठी तुझ्यावर अस्त्रांचा मारा केला पण जोपर्यंत मी रथावर आरुढ होतो तो पर्यंत ती अस्त्र रथाला स्पर्श करु शकत नव्हती,ती रथाभोवतीच फिरत राहीले मी रथ सोडताच ती त्यांच्यामुळे रथ जळून नष्ट झाला.      जो पर्यंत विवेकरुपी श्रीकृष्ण आपल्या मनरुपी अश्वांचा लगाम धारण करुन असतो तो पर्यंतच आपला रथ योग्य प्रकारे मार्गक्रमण करत असतो. विवेकाने मनाचे लगाम सोडताक्षणी राग,लोभ,मद,मत्सर,अहंकार यासारखी अदृष्य अस्त्र आपल्या जीवनाचा रथ चुकीच्या दिशेला धावून भस्मसात होतो.      कायम जमिनीवर पाय असणारा आदर्श धुरंधर, कलियुगातही फक्त आणि फक्त ज्याच्या पाऊलखुणांवरती चालून माणसं यशस्वी होतात त्या श्रेष्ठ राजकारणी श्रीकृष्णाला...

मी पुस्तक

शब्द माझ्या मनामधले तीने उचलून घेतले, आणि तीच्या भावनांनी मी नखशिखांत भिजले. अर्थ होता, स्वार्थ होता थोडासा परमार्थ होता,त पण तीच्या स्पर्शामध्ये अमृताचा भास होता. एक क्षणात रेखले त्याने कागदावरी अक्षरचित्र, आणि तीच्या चिंतनाने लाभले शंभर अर्थ. शब्दांची दुनिया निराळी थाटून मी बैसले, आणि तीच्या जवळीकेने मी कृतार्थ झाहले. आज झाला स्पर्श तीचा आणी मनात उत्सव सजला या पुस्तकी जीवनाला नवीन जन्म लाभला.

पाऊस आणि ती

सुख-दु:खाचा श्रावण सरवा हळूच येतो,हळूच जातो, तीच्या मोकळ्या केसांमधूनी गंधवेगळा पाऊस झरतो. फुलाफुलांचे गंध लेवून थंड रेशमी वारा येतो, तीच्या गुलाबी अधराचाही गंध अनोखा त्यात मिसळतो. आकाशी लोळ उसळतो धरणीकडे धावत सुटतो, तीच्या कोवळ्या स्पर्शामधूनी एक वेगळा झंकार उठतो. अगळे वेगळे रुप घेवून सृष्टीचा रंग बहरतो, तीच्या देखण्या रुपाने मग मनामनात रोमांच उठतो. सृष्टीचा हा अलवार सोहळा धारांच्या तालावर रंगतो, तीच्या भावूक नजरे मध्ये आपुले अपुरे स्वप्न शोधतो.

मैत्रीदिन

शब्द

मी शब्दांवरती प्रेम करतो शब्द तिच्या अधीन असतात, म्हणून मी बोललेले शब्द ही तीच्या डोळ्यातून हसून बघतात.

यादें

न जाने कितनें ठोकरों से गुजरना पडता है । उसके यादों को  जिंदा रखने के लिए।।
सोडोनीय वायू मागल्या दाराने वेधले ते केस नाकातले. हासोनीया गाली पुर्ण श्वासभरी नाक सर्व धरी आपापले. किती ते सुख स्वत:मुक्त होणे त्रासणें सर्वांचे हर्ष होई.

ओवी

दोन्ही कर जोडोन,मान थोडी झुकवोन जावूया शरण, ईश्वरासी. करू या स्तवन, गावूया किर्तन करुया मनन, ईश्वराचे. ठेवूया स्मरण,करुया मनन होवूया लाडके ईश्वरासी. जावूया शरण, मिळूया त्याच्यात अभयहस्त शिरी, ईश्वराचा.

संकटसमयीं ईश्वराचा धावा

येक कथा स्मरली. आप्पांनी "मोगरा फुलला" मध्ये शब्दबद्ध करोन ठेवलेली.......   " येक बापुडा अथांग डोही पोहायास उतरला.पाणी तुटेना,पार लागतां दिसेना.   बुडतों ऐसें देखोन त्याणे देवतास्मरणास प्रारंभ केला. आगोदर मारुतीरायास सांकडें घातलें, कीं हनुमन्ता, तुजविणें या दुस्तरांतून कोण पार पाववील ? मारुतीरायांनें गाऱ्हाणें आइकलें, तो उठिला.गदा पेलिली.पुच्छ आवरिलें.आता तो निघणार, तो घाबरा झालेल्या त्या बापुड्यानें मारुतिरायास त्यागोन आदिमितेचे धांवणे केलें, कीं भगवती ! आता तुझीच आस. मारतिराया स्वस्थानी बैसला. आंबा पदर सांवरोन उठिली, तिणें आपल्या वाहनाचें स्मरण केलें. आयाळ सांभाळीत सिंह येवोन मातेपुढती उभा  राहातो, तोंवरी अंबेच्या कानीं विव्हल स्वर पडिला, की खण्डेराया,या निकर क्षणी त्वां तरी मज दिनास उद्धरावेंस ! आणि. खण्डेराय आपल्या अश्वावर बैसोन डोहाशीं जातो, तों त्यास केवळ बुडबुडे दिसले !"      ये वाचोनी माझ्या मनी येक कथा स्फुरली......   "कोणे एके काळी, जगता वरी येका व्हायरसची छाया पडली. येक बापुडा मनोमनी घाबरोन गेला, हवालदिल जाहला.त्याने होमिओपॅथीश्वराचा धावा ...
विफल आस...... तुझीया भेटीची     धरूनिया आस तुझ्या मंदिरास      आले नाथा. क्रमियेला मार्ग      किती घाईघाई उत्कंठा हृदयी       तीव्र दाटे. तुझ्या दर्शनाचा      बघाया सोहळा पंचप्राण गोळा       झाले नेत्री. श्रीमुख देखून        संतुष्ट होईन मस्तक ठेवीन        पायांवरती. घट्ट कवळून          गोजिरी पाउले आंसवांच्या जले    न्हाणीन मी. हृदयी दाटले         अनन्त उमाळे करीन मोकळे       तुजपाशी. याचासाठी माझा    आसावला जीव घेतली मी धांव       तुजपाशी. हाय परी तुझे         बंद हे कवाड दर्शनाच्या आड      येई सख्या. दूर हे व्हायचे          कधी अन्तराय कधी तुझे पाय        लाभणार ? स्वहस्तेंच देवा         कवाड खोलून देशील दर्शन      ...

पन्नाशीनंतरचे प्रेम

कुबेर तुम्हारा चुक्याच.. तुम्हाला सरस्वतीचा वरदहस्त आहे, तुम्ही त्या ब्लॉगमधील विचार तुमच्या शब्दांत लिहू शकत होतात हे एक आणि तुम्ही तुमच्या विचारांमुळे तुमचे पाठीराखे गमावलेत हे दुसरे.इथे चोरी गुन्हा ठरु शकतो पण संघटित दरोडेखोरी कौतुकास पात्र ठरते.       आमचे एक काका, तुमच्या सारखेच सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले. त्यांना आवडलेले लिखाण स्वत:च्या नावावर पोस्ट करतात कोणताही कॉपी पेस्टचा उल्लेख न करता. त्यांचे वाचक कौतुक करतात त्या कौतुकाचा सुहास्य वदनाने स्विकारही करतात. काही दिवसांनी तीच पोस्ट दुसऱ्या कोणी शेअर केली की गदारोळ होतो, कोणीतरी या काकांना टॅग करतं,ते येतात स्माईल देतात,निघून जातात.      एव्हाना ती पोस्ट संघटितपणे या काकांच्या मांडीवर बसवली जाते,या भानगडीत कधीकधी ओरीजिनल पोस्टकर्ताही झोडला जातो.      काका लाईक-कॉमेंट मिळाली म्हणून खुष, वाचक कसा न्याय केला म्हणून खुष आणि हा सर्व गदारोळ होतो तो एक मोठी चोरी असलेल्या फेसबुकवरून.      कुबेर तुमचे चुकलेच तुम्ही पाठीराखे जपले नाहीत.
चंद्राने लाजून लपावे असा तो चेहरा आहे. मेघांनी महिरप मांडावी असा तो चेहरा आहे. दामिनीने चित्र रेखाटावे असा तो चेहरा आहे. भास्कराने पहाट उजळावी असा तो चेहरा आहे.

फेसबुकच्या भिंतीआडून

      एखादी आई आपल्या गोड, गोंडस,सदृढ बाळाला नटवण्यासाठी नादात शेजारच्या बाळाचे कपडे उसने आणून त्याला नटवते पण त्या नादात ते गोड बाळ बेंगरुळ दिसायला लागते.        तसेच काहीसे फेसबुकवच्या सिद्धहस्त लेखकांचे होतेय.

अक्षय तृतीया

ईगो

   ईगो हा रबरी फुग्या सारखा असतो. जो पर्यंत तो फुगत असतो तो पर्यंत तो स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली झाकला जातो.         आजूबाजूची लोकं तो फुगवण्यासाठी भरीस घालत असतात, पण एक क्षण असतो, फुग्याची आणि ईगोची फुगण्याची मर्यादा संपते आणि तो फटकन फुटतो,तो क्षण टाळता आला तो जिंकला.         एकदा तो फुगा फुटला, निरुपयोगी ठरला की अहंकारामुळे सत्यनाश झाला असे टोमणे तीच लोकं तत्परतेने मारतात.
कालची बातमी खोटी होती  पण त्यामुळेच हातात भरलेली वाटी होती. ज्ञानसुर्यांनो हा धंदा नाही,एक विचार आहे लेखणी नाही,ही तर दुधारी तलवार आहे. कित्येक वेळा मी केला असा अनाचार आहे पण हाय मी ही आज जखामांनी बेजार आहे. वाटते नको होवूया पुन्हा लाचार असे. पण हाच तर माझ्या जगण्याचा आधार आहे.
तुझ्या शब्दांची कविता बघ सजते आहे माझ्या शब्दांचा बोळा तीथेच पडला आहे. झालो आता एका शब्दाला महाग जरी मनात भरलेला सुगंध अजून तसाच दडला आहे. सांडले शब्द मनातले आता जरी इथे तीथे पायदळी तुडवलेल्यात जीव नकळत जडला आहे. आपुलकीच्या लाटा जरी आता खुप दूर गेल्या किनाऱ्याकडे धावण्याचा जोर आता वाढला आहे.

स्पिरीट म्हणजे काय रे भाऊ ?

स्पिरीट म्हणजे काय रे भाऊ ?          खुप गर्दीमुळे कोरोना रोग पसरतो हे माहीती असून अनावश्यक गर्दी करणे म्हणजे स्पिरीट की खेडेगावात एक किमी.अंतरात ५-६ माणसंच भेटतात माहीती असून मुखलंगोट लावून फिरणे म्हणजे स्पिरीट.          जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी मरणारच आहे त्यात काय घाबरायचे म्हणणे म्हणजे स्पिरिट कि आपल्याच इथल्या परदेशात खेळायला गेलेल्या खेळाडूंसमोर अन्नाची ताटली लांबून लोटून देणे म्हणजे स्पिरीट.          जे भक्तीमार्गात आहेत तेच वाचतील असे म्हणणे म्हणजे स्पिरिट कि निसर्गाने/ईश्वराने संतुलन साधण्यासाठी योजलेला उपाय आहे हा असे म्हणणे स्पिरीट.           हे जंतूंशी मानवांचे युद्ध आहे आणि ते विज्ञानाच्या सहाय्याने लढू म्हणणे स्पिरिट कि तापमान वाढले की व्हायरस नष्ट होईल या विश्वासावर हातावर हात धरुन स्वस्थ बसणे म्हणजे स्पिरीट.            मलाच सर्व समजतं मी मला हवे ते करीन असे उद्दामपणे म्हणणे स्पिरीट कि कोणीली दिलेली चांगले सल्ले मी अंमलात आणीन म्हणणे स...

काळाबाजार-- भावनांचा

काळाबाजार काही फक्त जीवनावश्यक वस्तूंचाच होत नाही........       एखादी व्यक्ती करुणाबुद्धीने,सेवा म्हणून एखादे काम करत असेल तर त्या कामावरचे माणुसकीचे लेबल काढून तिथे जातीचे लेबल चिकटवणे म्हणजे भावनांचा काळाबाजारच.

मनमोकळ्या गप्पा-मनाच्या मनाशी

मने,      आठवतय तुला दोन वर्षांपूर्वी तू मला अनफ्रेंड केलेस तेव्हा मी विचारले होते,"एवढी काय गरज होती अनफ्रेंड करण्याची ?      तेव्ही तू नेहमी सारखेच खुप मोठे लेक्चर ऐकवले होतेस,डिस्कनेक्ट होणे काय, मन:स्वास्थ काय किती अवघड शब्दात सांगायचा प्रयत्न केला होतास. मला अजिबात समजले नव्हते कारण मला ते समजून घ्यायचेच नव्हते,जी गोष्ट मनालाच पटली नाही ती का समजून घ्यायची.      पण सर्व अवघड गोष्टी सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या, गुरुंचाही गुरु असलेल्या निसर्गाने गेल्या दोन वर्षात हे सुद्धा समजावून दिले.            मने, आपण प्रेमाने बागेत लावलेली,गुलबक्षी, सदाफुली, लाजाळू जेव्हा बागेतल्या बाकीच्या झाडांना गराडा घालून नष्ट करु पाहतात तेव्हा त्यांच्यावर कात्री चालवावीच लागते.            मने,सावरता येत नसेल तर आवर घालावा लागतोच हेच तेव्हा तू सांगत होतील.      पण तरीही मने डिस्कनेक्ट होणे आणि तोडून टाकणे यात जमीन आस्मानाचा फरक आहे हे नाही का समजले तुला.         ...

धुलिवंदन- आपली संस्कृती

धुळवड अर्थात धुलिवंदन बहिणाबाई चौधरींच्या एका कवितेच्या ओळी आहेत--- मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर। अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।। विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते पण मनातील राग,द्वेषबुद्धी यावर कोणताही उपाय चालत नाही. भारतीय संस्कृतीवर कायम एक आरोप केला जातो तो म्हणजे ही संस्कृती भावनांचे दमन करायला लावते पण होळी आणि धुळीवंदन हे याला चोख उत्तर आहे. होळीच्या दिवशी मनातील राग-द्वेष, किल्मिष होळी पेटवताना व्यक्त करुन त्यांना जाळून,नष्ट करुन मोकळे व्हायचे, आधुनिक मानसशास्त्र हे पण हेच सांगते," भावना मनात दाबून टाकून कुढत राहण्यापेक्षा, त्या व्यक्त करुन त्यांचे ओझे मनावरुन उतरवून टाकणे हा मनाच्या स्वास्थासाठी चांगले असते" हि संधी होळीच्या रुपाने आपली संस्कृती आपल्याला देते. होळीच्या वेळेला निरुपयोगी पालापाचोळा,लाकूड फाटा, त्याच बरोबर मनातील अडगळही जाळून टाकायची. दुसऱ्या धुळीवंदनाच्या दिवशी ती राख अंगाला फासून त्या सगळ्या अडगळींपासून निवृत्त व्हायचे, अनेक प्रकारच्या झाडांची ही राख औषधी असते,त्वचारोगांवर त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. त्याच होळीच्...

जागतिक महिला दिन

दंडवते आज्जी :- भयंकरणी तू मला विसरलीस फॉरीनला गेल्यावर पण तुझा छोटा दादा नाही विसरला बरं का, आजही तुझा नाही पण त्याचा मेसेज आला हो शुभेच्छा द्यायला. अ भयंकर काकू :- काय उपयोग त्या फॉरवर्डेड मेसेजचा,मनापासून लिहीलेले दोन शब्द जास्त आनंद देतात त्या पेक्षा. हे फॉरवर्डेड मेसेज पाठवून नाती जपणं म्हणजे दुसर्याच्या जागेत कृत्रिम झाडं लावून ऋतू बदलण्याची वाट बघण्यासारखंच. दंडवते आज्जी :- अगो, सगळ्यांनाच नाही जमत मनातले विचार शब्दात मांडायला. ऋतू वरुन आठवले, मराठीमध्ये कितीतरी मोठमोठे लेखक होवून गेले. दुर्गा भागवत,शरदिनी डहाळूकर आणि आणखी दोनचारजणं सोडता कितीजणांनी सृष्टीला भरभरुन देणाऱ्या ऋतूंना शब्दबद्ध केले आपल्या लेखणीतून. अ भयंकर काकू :- हे काय मधेच ऋतूंचे आणलेत तुम्ही कुंचकानीकुंचका. दंडवते आज्जी :- स्त्री ही ऋतूं सारखीच असते.निसर्गातले ऋतू बदलतात आणि निसर्गांचा रंग बदलून जातो, प्रत्येक बदलत्या ऋतूबरोबर निसर्गसृष्टी समृद्ध होत जातो. माणसांच्या आयुष्यात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात स्त्रीही वेगवेगळे ऋतूरंग घेवून, वेगवेगळ्या रुपात येते,भरभरुन देते, आयुष्य समृद्ध करते आणि तरीही नेहमीच्या सवय...
मुक्यांचे नेहमीच फक्त शोषण होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही मुकी जास्वंद, ना हिला देवच्या पायांवरती जागा,ना सुशोभित उद्यानांनमध्ये, हिचा उपयोग फक्त लहान मुलांकडून मध शोषून घेण्यासाठीच.          जी गोष्ट साध्या कुत्र्याला उमजली सर्वांना समजतेच असे नाही, कुत्राही विनाकारण भुंकत राहतो कारण त्यालाही माहीत असतं आपण शांत राहीलो तर मालक अन्न घालायच विसरेल.          ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात आली ती पाश्र्चात्य संत आदरणीय व्हॅलेंटाईन यांच्या, त्यांनी मुक्यांसाठी एक दिवसच ठरवून दिला, या दिवशी कोणीही मुक्यांनी आपल्या भावना आपल्या प्रिय व्यक्ती समोर व्यक्त करु शकतो.           रा.रा. मार्कआण्णा झुकेनबर्ग यांच्या सहर्ष योगदानामुळे या मुक्यांची ही गाथा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली.           मुक्यांचे हे महत्व लक्षात," शंभर करोड इंडीयन व्हॉट्सअप गुळपाडू ग्रुप" तर्फे एक ठरावा बिनविरोध पास  करण्यात आला, फेसबुकला जगभर फेसबुक म्हटले तरी सर्वाधिक युझर असलेल्या भारतात त्याचे नाव.................

विफलता

परवा एक ब्लॉग वाचताना एक सुंदर वाक्य वाचायला मिळाले," विफलतेतून द्वेषाचा जन्म होतो"        आपले अपयश हे पचवायला शिकले पाहिजे,अपयश हे जर मनाला विफलतेच्या खोल गर्तेत ढकलत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज.        प्रत्येक वेळी यश मिळालेच पाहिजे हा अट्टाहास सोडून दिला पाहिजे.तुमचे यश हे दुसऱ्या कोणाचे अपयश असू शकते किंवा याच्या उलट तुमचे अपयश दुसऱ्या कोणाचे यश ही.        प्रत्येक वेळी अपयशी व्यक्ती द्वेषाच्या मार्गावर धावू लागला तर हा समाज कोलमडून पडेल.

चुंबन

माझ्या वाचनातील पहिली चुंबन कविता "राम गणेश गडकरी" यांनी १९१२ साली लिहीली," पहिले चुंबन"  त्या कवितेचा शेवट करताना ते लिहीतात,                  "निशिदिनी। वाटते मनीनित्य जन्मुनी| मरण सोसावे ।          परि पहिले चुंबन घ्यावें । फिरुनिही॥6॥      त्यानंतर शेकडो कवींनी हा विषय चाखला.       एका अज्ञात कवीने ना.धों. महानोर यांचे शब्द उसने घेवून लिहीले आहे,             " या कवीने               त्या कवीचे              शब्द घ्यावे              आणि कवितेच्या वाऱ्यावरी              स्वार व्हावे              सुटेल मांड तुझी कधी चुकीने              पण कवी म्हणून गावात मिरवावे.              कोणती पुण्ये अशी     ...

मिठी

आतल्या गाठीची माणसं जेव्हा मिठीमध्ये शिरतात, हळव्या रेशमी नात्यांनाही निरगाठी बनवून टाकतात.

मिठी....

मिठी........ शब्दांनी हळूवार पणे दिलेले आलिंगन किंवा शब्दांची जिवघेणी मगरमिठीच जास्त दिवस लक्षात राहते                   आयुष्यातील पहिली मिठी म्हणजे आई- बाबांनी हळूवारपण पहिल्यांदा जवळ घेणे आणि बालपणीच्या असंख्य वेळा जवळ घेतलेले आपण सहज विसरुन जातो.                   नंतर काळा प्रमाणे मिठीची मागणी आणि आवेग बदलत जातो.                   मित्रमंडळींची आश्वासक मिठी, प्रेयसीची अल्लड  मिठी, पत्नीची उबदार मिठी,मुलांची उभारी देणारी मिठी,नातवंडांची कोवळी लुसलुशीत मिठी.                   तरीही आयुष्यभर लक्षात राहते ती शब्दांनी मनावरती घेतलेली पकड. ती मन,मत आणि आयुष्य बदलण्याइतकी सामर्थ्यवान असते.

प्रेम-गांभुळलेली चिंच

पहिल्या नजरेत तोंडाला पाणी सुटते. तिला मिळवल्याशिवाय चैन पडत नाही. एकदा ती मिळाली की मांजर जसे डोळे मिटून दूध पिते तसे हळून सगळ्यांच्या नकळत....... फक्त खास माणसांनजवळ आपली हे गुपीत शेअर केले जाते. शेवटपर्यंत साथ दिली तर अपुर्व समृद्ध आनंद मिळणार हे नक्की. प्रेमाबद्दल नाही गाभूळलेल्या चिंचेबद्दल आहे हे, प्रेम हे असतच गाभूळलेल्या चिंचेसारखे, आंबट,गोड,तुरट, फक्त योग्य वेळ येईपर्यंत धीर धरला पाहीजे.

संक्रांतीचे वाण-

ती कृष्ण-अर्जून,कर्ण आणि सोन्याची टेकडी यांची गोष्ट सगळ्यांनी वाचली असेल,असणारच फॉरवर्डींगच्या या युगात कोणीच कोरड राहू शकत नाही या मेसेजींग पासून.                आपण जे पुर्वापार करत आलोय पण आता विसरुन गेलोय तेच तर या मेसेजमध्ये सांगितले आहे.                आज रथसप्तमी, सगळ्यांकडचे हळदीकुंकू कार्यक्रम संपले असतील. संक्रांतील वाण लुटण्याची आपली परंपरा, आपल्या हातांनी उचलून घेण्याची परंपरा सोडून आपण प्रत्येकीला अगदी पदर हातात धरुन देण्याची परंपरा स्विकारली आणि आता हे मेसेज फॉरवर्ड करुन

फेसबुक

पुर्वी असे बोलले जायचे.... वऱ्हाडातल्या एखाद्या शहरात एखादा खडा भिरकावला तर तो वकीलाच्या डोक्यावर पडतो. लाहोरमध्ये कुठेही नजर फिरवली तर ती एखाद्या सुंदर ललनेच्या मुखावर पडते. डोंबिवलीमध्ये जोशी अशी हाक मारली तर पाच पंचवीसजणं मागे वळून बघतात. कोणतेही बटण दाबले तरी मत कमळालाच जाते. त्याप्रमाणेच  इथे कुठे ही लाईक,बदाम आणि पुष्पगुच्छ भिरकावला तरी तो सुंदर स्त्रीच्या पोस्टवरतीच जावून पडतो.

नोटिफिकेशन्स

कपड्यात सुळसुळणारा ढेकुण चिरडून टाकल्याशिवाय चैन पडत नाही       तसेच फेसबुक-व्हॉट्सअपच्या नोटिफिकेशन्स वाचल्याशिवाय चैन पडत नाही.      असं म्हणतात चिरडलेल्या  ढेकणाच्या रक्तातून नवीन ढेकूण जन्म घेतात.       तशाच एकदा वाचलेल्या नोटीफिकेशन नवीन नोटिफिकेशन बघण्याच्या इच्छेला जन्म देतात.
या कोवळ्या उन्हाला बघ रातराणीचा सुवास आहे, तुझ्या केसात माळण्या बघ मोगरा आतूर आहे. नको सोडवू गुंता केशसंभार अफाट आहे, त्यात विसावण्याला बघ जीव हा आतूर आहे. असे कसे मन माझे आज हे फितूर आहे, बघ जीव माझा तुझ्या मागे फरार आहे. नको दाखवू विभ्रम असे रुप तुझे जिवघेणे आहे, बघ प्राण माझा त्याच्यासाठी कुडी सोडण्या तयार आहे.

लाजरी

असे स्वत:शी लाजणे बरे नव्हे अशा पापण्या झुकवणे बरे नव्हे, नको व्यक्त करु गुज तुझ्या मनीचे असे मुक्याने बोलणे बरे नव्हे.

मन

मन मोठ्ठच असतं तसं सगळ्यांचं पण त्यात सामावलेली माणसं जेवढी खुजी तेवढं ते लहान होत आक्रसत जातं.